Homeगडचिरोलीचामोर्शी-हरणघाट रस्त्याची दुर्दशा कळसाला – जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, नागरिकांची संतप्त मागणी.

चामोर्शी-हरणघाट रस्त्याची दुर्दशा कळसाला – जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, नागरिकांची संतप्त मागणी.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी::-

चामोर्शी–हरणघाट हा महत्त्वाचा मार्ग अक्षरशः मृत्यूदर्शक ठरत आहे. संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी झाकला असून वाहनचालकांना खड्डा टाळायचा की अपघात याचा निर्णय घेणे कठीण झाले आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडला, आणि धुळीमुळे प्रवास हा नागरिकांसाठी रोजचा जीवघेणा संघर्ष बनला आहे.

 

या मार्गावरून शाळकरी मुले, कामगार, शेतकरी, महिलावर्ग, रुग्ण आणि ग्रामीण भागातील शेकडो नागरिक दररोज प्रवास करत असताना रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने कायमच कानाडोळाच केला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.चामोर्शी येथील गगंभीर रुग्ण चंद्रपूर हलवताना या रस्त्यावरून चांगलाच दमछाक करावी लागत आहे,रुग्णाला अक्षरशः जीव रडकुंडीला आलं आहे तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे,

काही दिवसांपासून या रस्त्यावर लहानमोठे अपघात वाढले असून दुचाकीस्वारांना पडून दुखापत होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. कालच रस्त्याच्या दुरवस्था मुळे मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला,तरीही प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही ही शोकांतिका आहे,माणसाला आपल्या हक्कासोबत आता रस्त्यासाठी ही संघर्ष करावा लागत आहे तरी हक्क मिळत नाही, स्त्याच्या नागरिकांचा उद्रेक आता उफाळून आला असून जिल्हाधिकारी यांनी स्वतः हा मार्ग पाहून तात्काळ दुरुस्तीचे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग नेमकी केव्हा येणार?”—

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गाढ झोपेत गेलेल्या यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रस्ते, पूल, इमारती या मुलभूत सुविधांच्या कामांवर सतत होत असलेली दिरंगाई, ठिकठिकाणी नासधूस, आणि कोट्यवधींच्या निधीचा होत असलेला कथित अपव्यय — यामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांत रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. वारंवार तक्रारी, मागण्या, निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कानावर हात ठेवून निवांत बसल्याचे चित्र आहे. कामांच्या गुणवत्तेवर लक्ष नसल्याने काही ठिकाणी तर नव्याने झालेले डांबरीकरण काही महिन्यांतच उखडून खड्ड्यात बदलले आहे.

नागरिकांचा सवाल सरळ आहे—
“कामांचे टेंडर देताना एवढी घाई आणि कामाच्या दर्जाबाबत मात्र उदासीनता का?”
“ठेकेदारांना जबाबदार धरण्यास PWD घाबरते का?”

पावसाळा असो वा उन्हाळा, रस्त्यांवरील खड्डे कायम. ग्रामिण भागात तर या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकरी रोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.

तज्ञांचे मत आहे की, कामांच्या चाचण्या, मोजमाप पुस्तिका, गुणवत्ता नियंत्रण व तपासणी याकडे विभागाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्यासारखे वातावरण आहे. दरम्यान, नागरिकांच्या त्रासाची कुणालाच काळजी नसल्याची भावना पसरत आहे.

शेवटी प्रश्न तोच —

**“सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग केव्हा येणार?

नुकसान झाल्यावर, अपघात झाल्यावर, की लोकांचा संताप रस्त्यावर उतरल्यावर?”**

हाच नागरिकांचा आक्रोश आहे… आणि या प्रश्नाचे उत्तर देणे आता PWDला अपरिहार्य झाले आहे.

नागरिकांचा सवाल —

नुकसानीची वाट बघून मग काम करणार का? या मार्गावर एखाद्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण?”

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोकांचा रोष वाढत असून, अद्यापही काम न झाल्यास चामोर्शी–हरणघाट मार्गावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments