HomeBreaking Newsगडचिरोलीत जमीन संपादन शेतकरीहित जपूनच; जबरदस्ती नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोलीत जमीन संपादन शेतकरीहित जपूनच; जबरदस्ती नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोलीत जमीन संपादन शेतकरीहित जपूनच; जबरदस्ती नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

योग्य मोबदला व पुनर्वसनाची हमी; मध्यम मार्ग काढण्याचे आवाहन

📍 गडचिरोली, दि. ४ (प्रतिनिधी)

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या जमीन संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे जपले जाईल. कोणत्याही परिस्थितीत जबरदस्ती केली जाणार नाही, तसेच संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योग्य मोबदला दिला जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

रामगिरी येथे आज गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्हा औद्योगिक विकासाच्या दिशेने वेगाने प्रगती करत असून ‘लोह व पोलाद हब’ म्हणून विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग उभारणीसाठी जमीन संपादन आवश्यक असले तरी शासनाचा उद्देश शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्याचा नाही.

सर्व संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून सामंजस्याने मध्यम मार्ग काढत जमीन संपादन प्रक्रिया राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, यावर भर देत त्यांनी सांगितले की, जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय्य मोबदल्यासोबतच पुनर्वसनाची योग्य व्यवस्था केली जाईल.

विकास प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेण्याचा शासनाचा प्रयत्न असून, शेतकऱ्यांनीही सकारात्मक भूमिका घेत सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शासनाचा कोणाच्याही जमिनीवर बळजबरी करण्याचा कोणताही मानस नसून, स्वेच्छेने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. तसेच स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी उद्योगांशी समन्वय साधून आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले.गडचिरोलीत जमीन संपादन शेतकरीहित जपूनच; जबरदस्ती नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
योग्य मोबदला व पुनर्वसनाची हमी; मध्यम मार्ग काढण्याचे आवाहन
📍 गडचिरोली, दि. ४ (प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या जमीन संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे जपले जाईल. कोणत्याही परिस्थितीत जबरदस्ती केली जाणार नाही, तसेच संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योग्य मोबदला दिला जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
रामगिरी येथे आज गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्हा औद्योगिक विकासाच्या दिशेने वेगाने प्रगती करत असून ‘लोह व पोलाद हब’ म्हणून विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग उभारणीसाठी जमीन संपादन आवश्यक असले तरी शासनाचा उद्देश शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्याचा नाही.
सर्व संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून सामंजस्याने मध्यम मार्ग काढत जमीन संपादन प्रक्रिया राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, यावर भर देत त्यांनी सांगितले की, जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय्य मोबदल्यासोबतच पुनर्वसनाची योग्य व्यवस्था केली जाईल.
विकास प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेण्याचा शासनाचा प्रयत्न असून, शेतकऱ्यांनीही सकारात्मक भूमिका घेत सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाचा कोणाच्याही जमिनीवर बळजबरी करण्याचा कोणताही मानस नसून, स्वेच्छेने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. तसेच स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी उद्योगांशी समन्वय साधून आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments