सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शी:-
चामोर्शी–हरणघाट मुख्य मार्गाची हालत दिवसेंदिवस बिकट होत असून खोल खड्डे, तुटलेली बांधणी आणि वाहतूक धोक्यात आली आहे. नागरिकांनी अनेकदा सोशल मीडिया, लोकल न्यूज आणि जनतेच्या व्यासपीठांवरून आवाज उठवूनही लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरूच आहे.
दररोज शेकडो नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गाने प्रवास करत आहेत. अपघाताची संख्या वाढत असूनही प्रशासन गप्प—ही बाब जनतेत तीव्र नाराजी निर्माण करत आहे.
जनतेचा प्रश्न: “कधी होणार दुरुस्ती? अपघात झाल्यावरच जाग येणार का?”
रस्ता कोसळतोय, वाहनं मोडतात… पण PWD चामोर्शी दुरुस्तीच्या नावाखाली फक्त आश्वासनं
“शेकडो तक्रारी, रस्ता रोको, निवेदने… तरीही PWD चे इंजिनियर हलत नाहीत!”
बातम्या झाल्या भरपूर; पण चामोर्शी–रणघाट रस्ता अजूनही खड्ड्यांतच!
नागरिकांचे ओरड, सलग बातम्या, तक्रारी… तरीही PWD आणि लोकप्रतिनिधींकडून शून्य प्रतिसाद.
हा नेमका निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक दुर्लक्ष? रस्ता दुरुस्तीची मागणी आता आक्रोशात बदलत आहे.
—
✦
चामोर्शी–रणघाट रस्ता मृत्यूचा सापळा; पुन्हा बातम्या झळकल्या तरीही प्रशासन मौन







