सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
गडचिरोली : काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या कार्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये कृतज्ञतेची भावना व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या संदेशातून “पद बदलू शकते, पण कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मनातील स्थान बदलत नाही” असा सूर उमटताना दिसत आहे.
सदर संदेशात महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून केवळ पद भूषवले नाही, तर हजारो कार्यकर्ते, युवक, ओबीसी व विविध समाजघटकांना पक्षाशी जोडण्याचे कार्य केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.









